ज्ञानाची शेती

ज्ञानाची शेती

आपलेकडे, हरितक्रांती पूर्वीची शेती ही नैसर्गिक ( सेंद्रिय शेती ) होती. या शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या निविष्ठा बाजारातून विकत आणावयाची गरज नव्हती. पारंपारिक वाणाचे बियाणे शेतकरी स्वत: जतन करून पिढ्यान पिढ्या वापरत होते. खतासाठी मुबलक प्रमाणात पशुधन असल्याने सेंद्रिय खत पिकासाठी उपलब्ध होते व या पारंपारिक वाणावर फारसे किड व रोगांचा प्रार्दूभाव होत नव्हता. त्यामुळे किडनाशक वापरावयाचा प्रश्नच येत नव्हता. या शेती पध्दतीमध्ये शेतकरी स्वत:साठी आवश्यक अन्नाच्या बहुतांश गरजा आपलेकडील व गावातील परिसरातील शेतीमधून भागत होत्या व या शेतीचे ज्ञान व कौशल्य हे पिढ्यान पिढ्या हस्तांतरीत होत होते. म्हणजेच शेतीसाठी बाहेरील विकतच्या निविष्ठांची फारशी गरज पडत नव्हती आणि एकूणच ग्रामीण भारत हा स्वयंपूर्ण होता.
हरितक्रांतीनंतर संकरीत बियाणे आले, हे संकरित वाण कमी उंचीचे व उच्च उत्पादन क्षम असल्यामुळे त्यांचे उत्पादनासाठी रासायनिक खतांची आवश्यकता असते संकरित बियाणे व रासायनिक खताचे वापरामुळे पिकावर किड व रोगांचा प्रार्दूभाव होत असल्याने त्यांचे नियंत्रणासाठी रासायनिक किडनाशकांचा वापर करावा लागत आहे. हरितक्रांतीचे सुरूवातीचे टप्यामध्ये या सुधारित वाणांचा, रासायनिक खतांचा व कीडनाशकांचे वापरास, उत्पादन वाढीचे नवनवीन उच्चांक गाठणे शक्य झाले. कालांतराने उच्च उत्पादनाचे हव्यासापोटी एकच एक पिक मोठ्या क्षेत्रावर वर्षानुवर्षे लागवड केल्याने, त्याचवेळेस शेणखताची उपलब्धता कमी झाल्याने मातीचा सेंद्रिय कर्ब कमी होत गेला. तसेच वातावरणातील होणाऱ्‍या बदलामूळे पिकांची उत्पादकता वाढीचा आलेख हळूहळू खाली येवू लागला यामधून शेतक·यांचे उत्पन्न कमी होत गेले व शेतकरी उत्पादन वाढीसाठी या रासायनिक निविष्ठांचा अशास्त्रीय, अवाजवी व अतिरेकी वापर करू लागले त्यामुळे तयार होणाऱ्‍या कृषी उत्पादनामध्ये (धान्य, फळे, भाजीपाला ई.) रसायनाचे अंश मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले व त्यातून मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे व आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या जसे की, मधूमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर इत्यादी सारखे जिवनशैलीच्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत शेतकरी, समाज व उपभोक्ता (ग्राहक) यांचे स्तरावर अद्यापपर्यंत तरी गंभीरपणे विचार सुरू आहे असे दिसून येत नाही.
शेतीमधील अतिरेकी, अविवेकी व अशास्त्रीय कृषी रसायनांचा वापर कमी करून उत्पादन खर्च कमी करणे. म्हणजेच शेती फायद्याची व आरोग्यदायी होण्यासाठी, शेतकऱ्‍यांना शेतीमध्ये वापरण्यात येणा·या सर्व प्रकारच्या निविष्ठा व उच्च तंत्रज्ञानाबाबत अद्यावत माहिती उपलब्ध करून देणे व मानवी आरोग्यास पुरक असे अन्न तयार करणे, पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे, सुक्ष्मजीव, पाणी, मातीचे आरोग्य सांभाळून, शाश्वत व विषमुक्त (Residue Free) अन्न तयार करते हे मोठे आव्हान आजच्या शेतीसमोर आहे त्यासाठी " ज्ञानाची शेती " द्वारे शेतक·यांना कृषि संशोधन संस्था व प्रगतशील शेतकऱ्‍यांनी तयार केलेले उच्च तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्‍यांपर्यंत पोहचवण्याचे ध्येय ठेवून काम केले जात आहे. या माध्यमातून शेत पिकांच्या उच्च उत्पादन तंत्रज्ञान व शेती पध्दती बाबत मार्गदर्शन केले जात असून शेतकऱ्‍यांचे निव्वळ उत्पन्न वाढवण्यासाठी व ग्राहकांना विषमुक्त (Residue Free) अन्न उपलब्ध करून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.

ज्ञानाच्या शेतीचा इतिहास

एखाद्या व्यक्तीस कोणतीही शेतीची पार्श्वभूमी नसल्यास व नव्याने शेती करण्यासाठी ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी अधिकृत व संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध नाही. आपलेकडील तज्ञ मंडळी त्यास कोणते पीक निवडावे व पीक कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन करतात. परंतू एकत्रितपणे शेती बाबत माहिती तथा मार्गदर्शन मिळत नाही. म्हणजेच शेती करण्याबाबत आजही आपण माती, पाणी, पीक, बाजार व्यवस्था ई. चा तुकड्या-तुकड्याने विचार करत असतो. एकत्रितपणे " अ " ते " ज्ञ " असा शेती बाबत विचार करून अंतिम समाधानकारक माहिती देण्याकरिता आपल्याकडील प्रचलित व्यवस्था सक्षम नाही.
शेती संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या राज्य व केंद्र स्तरावरील कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषि विभाग, कृषी निविष्ठा उत्पादक, वितरक ई. मंडळी अग्रेसर असल्याचे दिसून येते परंतू ही सर्व मंडळी आपल्याकडील विशिष्ट विषयाचे सविस्तर ज्ञान समोरच्या व्यक्तीस देण्याचा प्रयत्न करतात परंतू समोरच्या व्यक्तीची गरज काय आहे ? याबाबत कोणताही विचार केला जात नाही. आपल्याकडील विषयनिहाय तज्ञ व्यक्ती उपलब्ध आहेत परंतू एकत्रितपणे सर्व विषयाच्या अनुषंगाने शेती करण्यासाठीचे अत्यावश्यक ज्ञान देण्यास ही मंडळी कमी पडतात. पिक उत्पादनाची माहिती असलेला तज्ञ हा किड व रोगाबाबत अनभिज्ञ असतो व रासायनिक खताचा तज्ञ हा तणनाशकाबाबतची माहिती विचारली तर कावरा-बावरा होतो. एकंदरच प्रत्येक तज्ञ व्यक्ती आपलेकडील ज्ञानाचे आधारे स्वत:चे पोट भरत आहे. परंतू समोरच्या शेतकऱ्‍याला आवश्यकते प्रमाणे व त्याचे गरजेनुसार ज्ञान व कौशल्य देण्यास सक्षम नाहीत, ही तज्ञ मंडळी शेतकऱ्‍यांचे प्रश्नाचे एकत्रित उत्तर देण्यास असमर्थ आहेत. यातून हे स्पष्ट होते की विषयवार तज्ञ मंडळी भरपूर आहेत परंतू शेतक·याला आवश्यक तेवढे, त्याला झेपेल एवढे, परवडणारे, सहज उपलब्ध असणारे असे एकत्रित ज्ञान व कौशल्य मिळण्याचे संस्था / माध्यम आपलेकडे उपलब्ध नाही.
कृषी क्षेत्रातील तज्ञ मंडळी अनेक शिफारशी व सल्ले देतात ज्याचा शेतकऱ्‍याला काडीचाही उपयोग होत नाही. शेती विभागातील अधिकारी मंडळी ही तर केवळ योजना राबविण्यात व्यस्त आहेत त्यांना शेतकऱ्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ मिळत नाही व त्यांच्याकडे शेती बद्दलचे अद्यावत ज्ञान ही नाही. या उलट शेतकऱ्‍यांना कृषि निविष्ठा (बियाणे, रासायनिक खते, किडनाशके, औजारे, सुक्ष्मसिंचन, ई) चे उत्पादन, वितरक, विक्रेते जोरकसपणे आपली उत्पादने शेतकऱ्‍याला वेगवेगळी प्रलोभने दाखवून विक्री करत आहेत. आजच्या शेतक·याला वरील बाजारव्यवस्था प्रत्येक अडचणीवर उपाय / पर्याय देत आहेत. परंतू त्यामधून शेतकऱ्‍यांचा तितकासा फायदा होत नसल्यामुळे उत्पादन खर्च वाढत जातो आणि उत्पन्न मात्र कमी मिळते. यामुळे शेती तोट्याची होत आहे.
शेतीमधील पिक निहाय, समस्या ओळखून त्या बाबतचे समाधान कसे देता येईल याबाबत कृषी संशोधन संस्था व प्रगतशील शेतकरी यांचे अनुभवाचा एकत्रित पणे विचार करून कमी खर्चात, कमी कष्टात, वापरल्यास सोपे, सहज उपलब्ध असे तंत्रज्ञान शेतकऱ्‍यास " ज्ञानाच्या शेती " मधून उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतक·यांच्या सर्व समस्यांची उत्तरे या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, शेती फायद्याची करणे, विषमुक्त अन्न ग्राहकांना पुरवणे हा उद्देश ज्ञानाची शेतीमधून साध्य करण्यात येत आहे.

आमच्या विषयी

एका छोट्याशा 1000 ते 1200 लोकसंख्येच्या व तालुक्याच्या अंतिम टोकास असलेल्या खेडेगावामध्ये झालेला जन्म. घरी मोठ्या प्रमाणात शेतीवाडी होती. हंगामी कोरडवाहू पिके तसेच मोजकी ऊस व भाजीपाला पिके सेंद्रिय पध्दतीने घेतली जात असत. एक मोठे संयुक्त (एकत्रित) कुटूंब, अबाल वृध्दासह जवळपास 60 व्यक्ती ही माझी कौटुंबिक पाश्र्वभूमी. घर आणि शेत एकच, वाड्याला लागूनच विहिर व शेत सुरू त्यामुळे घर आणि आंगण म्हणजे शेतच. मोठे कुटूंब असल्याने कुटूंबातील भावंड व छोट्या वयाची जेष्ठ मंडळी हेच माझे मित्र व सवंगडी होते. गावातील जि.प.शाळा मध्ये प्राथमिक शिक्षण नंतर बार्शी सारख्या कष्टकरी निमशहरी गावामध्ये 12 वी पर्यंत शिक्षण आणि ते ही स्वावलंबनाचे धडे घेत पूर्ण केले. त्यानंतर वैद्यकिय शास्त्राचे मानाची पदवीसाठी प्रवेश घेण्या एवढे गुण मिळूनसुध्दा कृषी महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश घेतला. त्यावेळी सुध्दा मनामध्ये कुठे तरी शेतीशी नाळ तोडावयास माझे मन तयार होत नव्हते. म्हणून एमबीबीएस चे प्रवेशाचे पत्र लपवून ठेवले, ते घरी / मित्रांना समजू दिले नाही. त्यानंतर बीएस्सी कृषी सहजरित्या उत्तम श्रेणीमध्ये उतीर्ण झाल्यावर एमएससी कृषी (म.फु.कृ.वि) राहूरीला प्रवेश मिळवला. त्यावेळेस सर्व विद्याथ्र्यांच्या मनामध्ये जे स्वप्न असते ते घेऊनच मी पण राहुरीला दाखल झालो. स्पर्धा परिक्षा व नियमित वर्गात हजेरी अशी दूहेरी कसरत करत पहिल्याच प्रयत्नात लेखा अधिकारी वर्ग - 2, पोलीस उपनिरिक्षक व कृषी सेवा वर्ग - 2 या पदाची एका पाठोपाठ अशी एका वर्षामध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झाली. वरील ईतर क्षेत्रातील आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेचा विचार सोडून कृषी खात्यात 1993 ला रूजू झालो.
आजपर्यंत जवळपास 32 वर्षे कृषी विभागात कार्यरत असतांना नांदेड पासून नाशिक तर रायगड पासून पुणे मार्गे सोलापूर व जालना, छ. संभाजीनगर ई. ठिकाणी तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर व राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. अशा विविध ठिकाणी काम करण्यास मिळाल्याने कापूस, सोयाबीन, मोसंबी, आंबा, द्राक्ष, डाळींब, भात, तूर ई. पिकांचे लागवडी बाबत शेतकऱ्‍यांसोबत तसेच कृषि विद्यापीठ यांचेसोबत काम करण्याचे भाग्य लाभले आणि या प्रत्येक ठिकाणी काम करताना मी कोणासाठी काम करत आहे ? या कामाचा, ज्यांच्यासाठी माझी नेमणूक झाली आहे त्यांना फायदा होत आहे का ? शेवटच्या शेतकऱ्‍याला याबाबत काय वाटते? याचा विचार सुरू राहत असे. म्हणजे मी स्वत:ला शेतक·याच्या ठिकाणी ठेवून त्या कामाचा / योजनेचा / उपक्रमाचा विचार करत असे त्यातून एक समज निर्माण होत गेली आणि शेती, शेतकरी, शासन, समाज व कृषि निविष्ठा उत्पादक व विक्रेते या सर्वांबाबतचे सूक्ष्म निरिक्षणातून मनाची मशागत झाली.
आज शेतीची अशी एकही समस्या नाही ज्यासाठी खाजगी उद्योजकांनी आपला माल (प्रॉडक्टस) बाजारात उपलब्ध केलेला नाही उदा. वाढ होत नाही पाण्यात विरघळणारी खते सोडा, मूळी चालत नाही ह्यूमिक वापरा, फूल निघत नाही - PGR फवारा ई. एवढे सर्व समस्यांवर जर उपाययोजना किंवा उत्तरे असतील तर मग शेती ही फायद्याची व्हायलाच पाहिजे. पण परिस्थिती मात्र संपूर्णपणे विपरित आहे. शेतकरी दर वर्षी डोक्यावरील कर्ज वाढवत आहे व ईतर सर्व व्यावसायिक मात्र कले कलेने आपला आर्थिकस्तर उंचावत आहेत, म्हणजेच शेतीचे प्रश्न वेगळे आहेत व उपाययोजना ह्या भलत्याच सुचविल्या जात आहेत किंवा केल्या जात आहेत आणि याबाबत कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, राज्य शासन स्तरावर फार काही मूलभूत विचार होत असेल असे आज तरी वाटत नाही. एवढे सर्व उपद्व्याप करून तोट्याची शेती शेतकरी करून ग्राहकांना पोसण्याचे काम मात्र इमाने इतबारे करत आहे. ह्या सर्व प्रकारच्या नवनव्या कृषि निविष्ठाचे चांगले परिणाम होत आहेत की नाही हे शेतकऱ्‍याला समजून येत नाही परंतू त्याचे दुष्परिणाम मात्र नक्की होत आहेत. शेतीसाठी या महागड्या निविष्ठांचा रसायनांचा अशास्त्रीय, अतिरेकी व अविवेकी वापराने अन्नसाखळीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा प्रवेश झालेला असून त्याचे आरोग्यासाठी फार मोठे धोके निर्माण झालेले आहेत याबाबत आज तरी गांभीर्याने विचार होत नाही व सर्व स्तरावर शांतता आहे. आज शेतकरी शेतीमध्ये सुखी व समाधानी नाही, म्हणजे शेतकऱ्‍यासाठी शेती फायदेशीर नाही तसेच ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अशा वेळेस आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, शेतीतून उमगलेल्या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा शेतक·यांना मिळवून देत असताना विषमुक्त अन्न निर्मितीसाठी " ज्ञानाची शेती " हा उपक्रम हाती घेतला आहे. " ज्ञानाची शेती " या संकल्पनेमध्ये शास्त्रीय आधार असलेले, ज्ञानाची व कौशल्याची शेती तंत्रज्ञान जे कृषी विद्यापीठ व प्रगतशील शेतकऱ्‍यांनी विकसित केले आहे त्यांचा अभ्यास करून हे ज्ञान काळाचे कसोटीवर घासून शेतक·यांसाठी फायद्याची, कमी कष्टाची, सहज उपलब्ध होणारी, उत्पन्नात वाढ करणारी अशी प्रारूप (मॉडेल) तयार करून शेतक·यांचे फायद्यासह, ग्राहकांचा सकस, रसायनमुक्त, आरोग्यदायी अन्नपुरवठा करावयाचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आमचे उपक्रम

" ज्ञानाची शेती " या उप्रकमामध्ये कृषि विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था व प्रगतशील शेतकरी तसेच जागतिक स्तरावर कृषीमध्ये होणारे बदल या सर्वांचा एकत्रित विचार करून आपलेकडे घेण्यात येणा·या तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, फळबागा ई. पिकांसाठी शास्त्रशुध्द तांत्रिक माहितीचे एकत्रीकरण, सुसत्रीकरण करून शेतक·यांना समजेल असे, वापरण्यास सुलभ, कमी खर्चात, सहज उपलब्ध होणारे व कष्ट कमी करणारे तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार नाही. ज्ञानाची शेती अंतर्गत खालील विषयावर काम केले जाणार आहे.

- मातीचे आरोग्य सांभाळणे, संवर्धन करणे, सेंद्रिय कर्ब वाढविणे.
- शेतीवरील खर्च कमी करणे
- शेतीमध्ये वापरावयाचे निविष्ठा बाबतची तांत्रिक माहिती
- प्रत्येक बाबी वापरण्या मागचा कार्यकारण भाव.
- पाणी व्यवस्थापन.
- कोरडवाहू शेती अंतर्गत पर्यावरण पूरक पिक लागवड पध्दती
- तृणधान्य (Millets) लागवड तंत्रज्ञान
- कडधान्य लागवड तंत्रज्ञान.
- गळीतधान्य लागवड तंत्रज्ञान.
- फळबाग व भाजीपाला पिकांचे विषमुक्त (Residue free) व निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान.
- एकात्मिक अन्नद्रव्य व रोग व्यवस्थापन
- शेतावरच कमी खर्चाच्या, स्थानिक संसाधनाचा वापर करून, पर्यावरण पूरक कृषी निविष्ठा तयार करणे.
- शुन्य मशागत तंत्रज्ञान, सगुना रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान व शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे.
-कृषी रसायनाऐवजी जैविक बुरशी, जिवाणू , व वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर करून पिक संरक्षण करणे.