राजगिरा - सुपरफुड, सुधारित लागवड तंत्रज्ञान
✅ अत्यंत बहुगुणी आणि पौष्टिक म्हणून या पिकास " सुपरफुड " म्हणतात
✅ खरिप आणि रब्बी हंगाम मध्ये लागवड करता येते परंतु रब्बी हंगामातील लागवड फायदेशीर ठरते
✅ लव्हाळा तणाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी राजगिऱ्याची लागवड करतात
✅ मध्यम ते भारी काळी कसदार व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी
✅ धान्यासाठी फुले कार्तिकी, सुशीला, शंकर या सुधारित वाणाची लागवड करावी
✅ भाजीसाठी पुसा किरण,पुसा 1, पुसा लाल, अप्सरा, अरुण इत्यादी वाण लागवडीसाठी उपलब्ध आहेत
✅ राजगिरा बियाणे अत्यंत लहान व नाजूक असल्यामुळे वाळू किंवा जाड रव्यामध्ये मिसळून पेरणी करावी
✅ एकरी 1 किलो बियाणे पुरेशे असते
✅ 45 ×15 सेंटिमीटर लागवडीचे अंतर ठेवावे
✅ एकरी 24 किलो नत्र 8 किलो स्फुरद आणि 8 किलो पालाश आणी 8 किलो गंधक पेरणी करताना बियाखाली द्यावे
✅ 10- 15 दिवसांनी पहिली व 25 ते 30 दिवसांनी दुसरी विरळणी करावी
✅ रब्बी हंगामामध्ये 5 -6 पाण्याच्या पाळ्या या पिकास द्याव्या लागतात
✅ पाने खाणाऱ्या अळ्या, मावा, पांढरी माशी आणि फुलकिडे या किडी तर पानावरील डाग, मुळकुज, बुंधा कुज व भुरी या रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर होतो त्यासाठी एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत
✅ ११० ते १२० दिवसात पिक पक्व होते, काढणीस उशीर केल्यास दाणे गळून पडतात
✅ छोटासा घरगुती प्रक्रिया उद्योग उभारल्यास वर्षभर रोजगार तथा उत्पन्नाचे साधन होते